बाबो..! मराठमोळ्या मीरा जोशी ने उडवली नेटकऱ्यांची झोप; ‘या’ मालिकेत केली ऐश्वर्या रॉयच्या त्या बोल्ड सिनची कॉपी..

‘आज जाणे की जिद्द ना करो,’ हे गाणे ऐकले कि आता समोर येते, सुंदर अश्या ड्रेसमध्ये कमालीची हॉट दिसत असलेली ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर. ऐ दिल है मुश्किल सिनेमाच्या या सीनमध्ये, ऐश्वर्या राय मादक अश्या अंदाजामध्ये रणबीर कपूर याला आपल्या मोहात पाडत असताना बनवलेले हे गाणं.
मात्र, रणबीर कपूर सोबत, तिला पडद्यावर बघत असलेले सर्वच तिच्या या अंदाजवर घायाळ झाले.या गाण्याला ऐश्वर्याच्या याच हॉट आणि मादक अंदाजामुळे पुन्हा नवीन ओळख मिळाली. खरे बघता ऐ दिल है मुश्किल या सिनेमाचे प्रमुख आकर्षण ऐश्वर्या आणि तिचा बोल्ड अंदाज च होते.
आपण खूप वेळा बघतो असे, सुंदर सीन चित्रित होतात आणि आपल्याला वाटते या सीन पुन्हा असा बनूच शकत नाही. त्याचे कारण असते, त्या अभिनेत्री आणि अभिनेत्याची केमिस्ट्री. त्यांची केमिस्ट्री उत्तम असते म्हणूनच असे सीन इतक्या सुंदर पद्धतीने चित्रित केले जातात. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, देखील आपण असे बरेच सिन पाहिले आहेत.
मात्र आता, अशाच एका सीनची जबरदस्त चर्चा होत आहे. ऐ दिल है मुश्किल मधला तोच, हॉट आणि बोल्ड सिन आपल्या मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्ये पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहे.
अशी बायको अशी हवी मध्ये थेट, ऐश्वर्याचा हाच सिन मीरा जोशीने कॉपी केला आहे, म्हणजेच रिक्रिएट केला आहे. तुझं माझं ब्रेकअप मधून मेनका ची भूमिका साकारलेली मीरा जोशी आज घराघरात सर्वाना माहित आहे. मीरा एका उत्तम नृत्यांगना देखील आहे.
आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरून ती नेहमीच, आपले बोल्ड फोटोज शेअर करत असते, त्यामुळे ती नेहमीच एका चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र सध्या ती वेगळ्या कारणामुळे, चर्चा रंगवत आहे. बायको अशी हवी या मालिकेमध्ये ती राखीची भूमिका साकारत आहे. आणि याच मालिकेमधील एका रोमँटिक सिन ने सर्वांची झोप उडवली आहे.
विकास आणि राखी या दोघांमध्ये हा रोमँटिक सिन चित्रित करण्यात आला आहे. ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर च्या रोमँटिक सीनचा हा सिन कॉपी करण्यात आला आहे. अगदी तोच सिन रिक्रिएट करण्यात आला असून तो इंस्टाग्राम आणि सगळीकडेच जबरदस्त वायरल होत आहे.
या मालिकेमध्ये राखीचे पात्र, फन लविंग मुलीचे आहे त्यामुळे मीराला हे पात्र खूप आवडले असे ती सांगते. इंदोरी इश्क आणि ऑरेंज लिली या वेबसिरीज मध्ये काम करणारी मीरा सांगते की, विकास सोबत असा रोमॅंटिक सिन देताना तिला काहीच जड झाले नाही. विकास तिचा जुना मित्र आहे त्यामुळे हा सिन देताना दोघांमध्ये कम्फर्ट चांगला होता, नाही तर हा सीन इतक्या उत्तम पद्धतीने चित्रित करता नसता आला.