‘हा’ डायरेक्टर आहे मराठमोळ्या अलका कुबल यांचा नवरा, पहा फोटो….

‘हा’ डायरेक्टर आहे मराठमोळ्या अलका कुबल यांचा नवरा, पहा फोटो….

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री अलका कुबल यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. ‘माहेरची साडी’ला अभूतपूर्व यश मिळाले आणि या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणा-या अलका कुबल या नावाला संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख मिळाली. पण आज आपण अलका कुबल नाही तर त्यांच्या पतीबद्दल जाणून घेणार आहोत.

अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये हे फिल्म इंडस्ट्रीतील एक दिग्गज सिनेमेटोग्राफर म्हणून ओळखले जातात आणि आपणास सांगू इच्छितो कि अलका व समीर यांनी प्रेमविवाह केला आहे आणि त्याच्या या प्रे’माची सुरुवात कशी झाली, हे दोघांनाही कळले नाही.

खरं तर माहेरची साडी या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे अलका प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यासोबतच लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना, माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, सुवासिनीची सत्त्वपरीक्षा, अग्निपरीक्षा असे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रि’य आहेत.

आणि त्याच दरम्यान अलका कुबल आणि त्यांची भेट झाली आणि आपल्या चित्रपटाकरीता अभिनेत्री म्हणुन त्यांनी तिला करारबध्द केलं आणि मग शूटिंग दरम्यान एकेदिवशी त्याची भेट समीर याच्यासोबत झाली, आणि याच भेटीचे कालातंराने प्रे’मात रूपांतर झाले.

तसे सुरुवातीला अलका आणि समीर यांनी एकत्र चार पाच चित्रपट केले. यामुळे सेटवर त्यांचे बोलणे चालणे सुरूच होते. पण एका चित्रपटाच्या वेळी अलका आणि समीर हे दोघेच होते आणि त्यावेळी मात्र त्याच्यातील जवळीक अधिक वाढली तसेच ते दोघे त्यावेळी जुहू चौपाटीवर सुद्धा फिरायला जायचे आणि एकांतात वेळ घालवायचे.

अलका यांचा त्यावेळी नुकताच एक चित्रपट प्रसिद्ध झाला होता तो म्हणजे ‘माहेरची साडी’ ज्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. ‘माहेरची साडी’ हा चित्रपट खूप सुपरहिट ठरला. आता अलका यांना लोक ओळखू लागले होते त्यामुळे त्यांचे बाहेर फिरणे थोडे कमी झाले होते.

पण यांच्या फिरण्याची चर्चा अलका यांच्या घरापर्यंत पोहचली. त्यावेळी त्यांच्या आईने अलकाला विचारले की, नक्की तुमच्यात काय चालू आहे? पण अलका यांना काय बोलावे हे समजले नाही. दोघांच्याही डोळ्यात एकमेकांबद्दल प्रे’म दिसत होते पण ते सांगण्याची हिंमत दोघांपैकी कुणातही नव्हती. आपले एकमेकांवर प्रे’म आहे, हे जा’णवत होते पण प्र’पोज केले तर नकार नाही ना मिळणार या कारणाने बराच काळ त्यांनी एकमेकांना मनातले सांगितले नाही.

आई नेहमीच त्या विषयावर विचारू लागल्याने आणि समीर पुढाकार घेईनात म्हटल्यावर अलका यांनीच तो घेतला. किती वर्षे असे आणखी फिरायचे. आता तरी लग्न करूयात, असे अलका यांनी समीर यांना म्हटले आणि दोघांनीही आपआपल्या घरी या ना’त्याची कल्पना दिली.

असे विचारल्यावर समीर यांनी लगेच होकारही दिला. पण या लग्नाला अलका यांच्या कुटुंबाकडून थोडाफार वि’रो’ध झाला. या विरोधाचे कारण म्हणजे, अलका यांनी फिल्म इंडस्ट्रीतील मुलाशी लग्न करू नये, अशी त्यांची इच्छा होती. पण अखेर हा वि’रो’ध लवकरच मावळला आणि दोघांचा साखरपुडा झाला.

तसेच चार महिन्यांनी त्याचे लग्न सुद्धा झाले. पण अचानक कोणीतरी ‘माहेरची साडी’ या चित्रपटांच्या प्रमोशनवेळी असे प्रसिद्ध केल होत की अलका यांचे लग्न दादरला आहे. त्यामुळे तेव्हा लग्नाला चाहत्यांची खूपच गर्दी झाली आणि सगळ्यांचा गोंधळ उडाला होता.

समीर यांच्या कुठल्या गुणावर अलका भाळल्या तर तो म्हणजे, प्रामाणिकपणा. अलका यांनी एका मुलाखतीत हे सांगितले होते. चित्रपटसृष्टीतील लोकांचे खोटे चेहरे अलका यांनी पाहिले होते. त्यामुळेच समीर यांच्यातील प्रामाणिकपणा अलका यांना भवला. इतका की, लग्न करेल तर समीर यांच्याशीच नाही तर लग्नच करणार नाही. असे अलका यांनी ठरवून टाकले होते. याचवेळी अलका यांच्यातील समजुतदारपणा समीर यांना आवडला.

अलका यांनी बालकलाकार म्हणून व्यावसायिक नाटकांतून काम करायला सुरुवात केली. इयत्ता १० वी मध्ये असताना त्यांनी चक्र या चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. नटसम्राट, संध्याछाया, वेडा वृंदावन अशा काही नाटकांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. ‘स्त्रीधन’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत व्यावसायिक अभिनेत्री म्हणून प्रवेश केला. ‘माहेरची साडी’ या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

त्यासोबतच लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना, माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, सुवासिनीची सत्त्वपरीक्षा, अग्निपरीक्षा असे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले. यांपैकी काही चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली. अमृतवेल, युगंधरा, बंदिनी, येरे येरे पैसा, आकाशझेप अश्या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *