अखेर दिव्या सिंहने ‘देवमाणुस’ मालिका सोडण्याचे खरे कारण आले समोर, केला मोठा खुलासा, म्हणाली…

मराठी मालिका, घराघरात पहिल्या जातात. या मालिका, आणि त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही मालिका अगदी थोड्याच वेळात चाहत्यांच्या मनात जागा निर्माण करतात आणि त्यामधील पात्र देखील त्यांना आपले जवळचे वाटायला लागतात. अश्या अनेक मालिका सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर सुरु आहेत, आणि अनेक मालिका होऊन देखील गेल्या आहेत.
चार दिवस सासूचे, पासून ते आई कुठे काय करते पर्यंत मालिकांचे कथानक भलेही बदलले असतील. मात्र, एक गोष्ट नाही बदलली, आणि ते म्हणजे त्या मालिकांसाठी आणि त्या मालिकांमधील पात्रांसाठी चाहत्यांचे वेड. कोणत्याही मालिकेचा प्रोमो आला कि त्या मालिकेचे कथानक काय आहे, काय वेगळं आहे अशी उत्सुकता निर्माण होते.
‘देवमाणूस’मालिकेने प्रेक्षकांवर अक्षरशः गारुड घातलं आहे. मालिकेत दररोज येणाऱ्या नवनवीन ट्वीस्टने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. या मालिकेत अजित कुमार देव उर्फ देवीसिंग म्हणजेच डॉ’क्टरने अनेक नि’ष्पाप म’हिलांचा ब’ळी घेतला आहे. आणि आत्ता तो यासर्व गु’न्ह्यांसाठी को’र्टात उभा आहे.
या मालिकेतील पात्र प्रेक्षकांना खूप भावत आहेत. या मालिकेमध्ये एसीपी दिव्या सिंहची भूमिका मराठमोळ्या नेहा खान हिने साकारलेली आहे. नेहा खान ही मूळची अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहे. याबाबत अलीकडेच खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आणि बातम्या व्हायरल झालेल्या आहेत.
नेहा खान हिने खूप मोठ्या कष्टानंतर बॉलीवूड आणि मराठी मालिकांमध्ये आपले करियर केले आहे. यासाठी तिने अपार मेहनत केली आहे. काही दिवसापूर्वी याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये नेहा खान हिने तिच्या लहानपणी भो’गलेल्या क’ष्टाची माहिती देण्यात आली होती. नेहा खान हिने त्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की, माझ्या आईला तिच्या वडिलांकडच्या लोकांनी मा’रहा’ण केली होती.
त्यामुळे तिला 370 टाके पडले होते. हा वाद संपत्तीचा होता. त्यानंतर माझी आई घरी होती. त्यामुळे मला आणि माझ्या भावाला देखील काम करावे लागले होते. आम्ही रस्त्यावर जाऊन कुल्फी विकत होतो, असे ती म्हणाली. माझ्यासोबत माझा भाऊ देखील असायचा. मात्र, कालांतराने मी मुंबईला प’ळून आले. त्यानंतर बॉलिवूडमध्ये मी माझे फोटोग्राफ दिले. त्यानंतर मला काही जाहिराती मध्ये संधी मिळाली.
त्यानंतर मला देव माणूस ही मालिका मिळाली. आता ही मालिका चांगलीच गाजत आहे. असे असले तरी नेहा खान आता ही मालिका सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगात आहे. याचे कारण आता समोर आलेले आहे. देव माणूस मालिकेत डॉक्टर अजित कुमार देव याचे पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. हे पात्र किरण गायकवाड या अभिनेत्याने साकारलेले आहे.
या आधी त्याने लागीर झालं जी या मालिकेत देखील नि’गेटिव्ह भूमिका साकारली होती. आता देव माणूस मधील त्याची खलनायकी भूमिका सगळ्यांनाच खूप आवडत आहे. नेहा खान ही मालिका का सोडणार हे आता स्पष्ट झाले आहे. कारण बिग बॉस मराठी 3 मध्ये ती दिसणार आहे. आणि या सेशन साठी नेहा खान ही मालिका सोडणार असे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे आता नेहा खान बिग बॉस मध्ये लवकरच दिसणार आहे, असेही सांगण्यात येते. या मालिकेत नेहा खानच्या जागी इन्स्पेक्टर शिंदेची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता या मालिकेत अजित कुमार देव सुटतो का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.